पूर्वी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जात असत. कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरीस पासून मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे आणि त्यांना लावलेल्या रंगामुळे अशा मूर्तींच्या विसर्जनानंतर होणारे जलाशयांचे प्रदूषण लक्षात घेता अनेक जलाशयांमध्ये मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गणपतीची मूर्ती दान करण्याचे अभियान राबवण्यात येते.अलिकडच्या काळात पर्यावरण स्नेही शाडूच्या मूर्ती बनवण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक शाळांमध्ये आणि अनेक संस्थातर्फे शाडूच्या मातीच्या गणपती मूर्ती बनवण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येतात. आज पर्यावरणाच्या बदलत्या परिस्तिथीला बघून अनेक लोक शाडू मातीच्या गणपती मूर्तीमध्ये झाडांच्या बिया ठेवतात आणि गणपती मूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन सुद्धा करतात. यामुळे पाण्याचे प्रदूषण हि होत नाही आणि गणपती मूर्तीचे यथायोग्य पद्धतीने विसर्जन सुद्धा होते. अश्या पद्धतीने विसर्जन केल्यामुळे विसर्जन केलेल्या ठिकाणी नवीन झाड येते. त्यामुळे पर्यावण जपण्यासाठी थोडीशी मदत हि होते.
No comments:
Post a Comment